पाणी हे मनुष्य च्या जीवनातला अत्याधिक आवश्यक घटक आहे. बिना पाण्याचे कुठलाही प्राणी जिवंत राहू शकत नाही. हा निबंध आहे पाणी वाचवा पाणी जिरवा (pani adva pani jirva essay in marathi) जिच्यात पाण्याचे महत्व सांगितले आहे. आशा करतो आपल्याला पाणी वाचवा मराठी निबंध (Save Water Essay in Marathi) पसंद पडेल.

Save Water Essay in Marathi

या निबंध चे शीर्षक या प्रमाणे असू शकते "पाणी अडवा पाणी जिरवा" किंवा "पाणी वाचवा" किंवा "पाण्याचे महत्व" मराठी निबंध. 


पाणी अडवा पाणी जिरवा निबंध

हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्‍त देणगी आहे. पाणी हे जीवनावश्यक असल्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या सोडवण्याला अग्रक्रम द्यावा लागतो. खेड्यापाड्यांतून ही समस्या फारच बिकट आहे. शहरात ठरावीक वेळी पाणी येत असेल, तर सर्व व्यवहार झटपट उरकून पाणी भरून ठेवता येते. पण खेड्यापाड्यांतील लोकांना घडाभर पाण्यासाठी मैलोन्‌मैल चालत जावे लागते किंवा गावात येणाऱ्या टँकरमधून कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. अर्थातच मिळालेल्या पाण्याचा उपयोग प्रथम पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी करणे भाग पडते.

स्वच्छतेसाठी पाणीच उपलब्ध नसल्यामुळे अस्वच्छतेतून रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास नवल काय ? माणसाच्या दैनंदिन व्यवहारासाठी पाण्याची एवढी चणचण भासते, तर शेतीला आणि वनस्पतींच्या वाढीला पाण्याची गरज किती पराकोटीची असेल, याची कल्पना केलेलीच बरी ! वास्तविक, भारत हा नद्यांचा देश आहे. भारताच्या काही भागांत पावसाचे पाणीही भरपूर मिळते. कोकणात व इतर अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो. पावसाळ्यात भारतातील काही नद्यांना पूर येतात. ब्रहमपुत्रा, गंगा, यमुना, गोदावरी इत्यादी नद्यांना येणाऱ्या पुरांमुळे आजूबाजूच्या प्रदेशाची वाताहत झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांत वारंवार येतात. याचा अर्थ असा कौ, उपलब्ध होणाऱ्या पाण्यापैकी ८० टक्के पाणी वाहून जाते, हे भारताचे दुर्दैव आहे.

धरण बांधून पाणी अडवणे हा त्यावरचा एक उपाय आहे. तसेच, देशभरच्या नद्या एकमेकांना जोडून नद्यांचे जाळेच निर्माण करण्याची एक योजना सध्या सरकारच्या विचाराधीन आहे. हा फारच मोठा फायदा देणारा उपाय आहे. पण ही योजना अत्यंत खर्चिक आणि खूप वर्षे लावणारी आहे. काही धरणांमुळे काही लोकांची सोय झाली असली, तरी अजून असे कितीतरी जिल्हे आहेत की, जिथे उन्हाळ्यात लोकांना थेंबभर पाणी मिळणे मुश्कोल होते.

भाक्रा-नानगल, दामोदर व्हॅली, कोयना, नाथसागर, नागार्जुनसागर अशी धरणे भारतात ठिकठिकाणी बांधली गेली, ही गोष्ट चांगली आहे. पण धरणांमुळे इतरही काही समस्या निर्माण झाल्या. धरणांमुळे खेड्यापाड्यांत बीज पोहोचली हे चांगले झाले; पण त्यामुळे विजेवर चालणारे पाण्याचे पंप वापरले जाऊ लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होऊन विहिरी कोरड्या पडल्या.

नद्यांचे पाणी धरणांकडे खेचले गेल्यामुळे नद्या कोरड्या पडल्या. विजेमुळे कारखाने सुरू झाले ही गोष्ट चांगली घडली; पण कारखान्यातील दूषित पाणी नदीत सोडले गेल्यामुळे जलप्रदूषण होऊ लागले. गंगा-यमुनेसारख्या मोठ्या नद्या इतक्या प्रदूषित झाल्या आहेत कौ, त्या शुद्ध करण्यासाठी कित्येक हजार कोटी रुपयांच्या योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याप्रमाणेच शेतीसाठीही आपल्याला पाण्याची गरज आहे. पाण्यासाठी आपण कितीही विहिरी खोदल्या वा पाण्याचे कितीही पंप बसवले, तरी ते सर्व निरुपयोगी ठरणार आहे. कारण जमिनीखालील पाण्याची पातळीच खाली खाली जात आहे. ही पातळी कशी वाढेल हे प्रथम पाहिले पाहिजे. यासाठी दोन योजना तातडीने हाती घेतल्या पाहिजेत.

एक म्हणजे मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करणे. झाडे आपल्या मुळांदूवारे जमिनीखालील पाण्याचे झरे धरून ठेवतात. झाडांची संख्या वाढली तर जमिनीखालील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. सध्या बेसुमार वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. म्हणून मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत. तसेच, ' पाणी अडवा, पाणी जिरवा ' ही दुसरी योजनाही युद्ध पातळीवर राबवायला हवी. यामुळेही जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. मग झरे, विहिरी, नद्या यांचे पाणी आटणार नाही. पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरू लागेल. 


पाणी अडवा पाणी जिरवा निबंध PDF

पाणी अडवा पाणी जिरवा निबंध pdf ला आपल्या फोने मध्ये डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To Download


तुम्हाला पाणी अडवा पाणी जिरवा निबंध (Marathi Essay on Save Water) निबंध कसा वाटलं कंमेंट मधे लिहा आणि आपल्या मित्रानं सोबत share  करा. 

Post a Comment

Previous Post Next Post