जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध | Importance Of Sports Essay In Marathi 

तुम्हा सर्वान साठी जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध लिहिला आहे (khelache mahatva essay in marathi).

essay on importance of sports in marathi

या निबंध मध्ये खेळाचे आपल्या जीवनात काय महत्व आहे हे व्यक्त केले आहे.  तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल.

जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध 

आज भारतीयांच्या जीवनात खेळांना महत्त्व आले आहे. आजकाल खेळाविषयीचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलू लागला आहे; पण काही वर्षांपूर्वी खेळण्यात वेळ घालवणारे मूल हे अवलक्षणी समजले जायचे. इतकेच काय, एखाद्याने 'खेळ' हे आपले जीवनध्येय (करिअर) करायचे ठरवले, तर त्याला ' भिकेचे डोहाळे' लागले असे मानले जायचे.

आज खेळातूनही पैसा मिळू शकतो, हे पाहून काही लोक तो आपल्या करिअरचा भाग करतात; पण त्याचबरोबर खेळाचे इतर फायदेही आज आपणाला उमगले आहेत. निकोप शरीरातच निकोप मन असू शकते, हे उमगल्यावर शरीर निकोप, सुदूढ ठेवण्यासाठी माणसे धडपडू लागलीं आणि निकोप शरीराचा एक मार्ग खेळाच्या पटांगणातून जातो, हे उमगल्यावर त्यांना खेळ हवेहवेसे वाटू लागले.

लहानपणी आपला बराचसा वेळ हा खेळण्यात जातो; पण लहानपणचे बहुतेक खेळ हे गमतीखातर खेळले जातात. त्यांत कोणतीही शिस्त नसते. बालपण हे फुलपाखरासारखे असते. जेव्हा बालपण संपते, शैशवही ओलांडले जाते आणि कुमारावस्था प्राप्त होते, तेव्हा शिस्तीची आवश्यकता निर्माण होते. जीवनातील सर्वच क्षेत्रांत शिस्त अनिवार्य आहे, तशी ती खेळांतही आवश्यक असते.

खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा सांधिक खेळ आहे. तेथे आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते ब मनाला उत्साह मिळतो. दोन-चार तास अभ्यास केल्यावर कंटाळा येतो. त्यानंतर थोडा वेळ खेळल्यावर कंटाळा पळन जातो आणि अभ्यासासाठी पुन्हा उत्साह येतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते; चापल्य येते.

खेळांचाही अभ्यास करावा लागतो, खेळालाही सराव लागतो आणि खेळासाठीही उत्तम मार्गदर्शक गुरू असावा लागतो. खेळ म्हटला की यश आणि अपयश आलेच. कधी हार होणार, कधी जीत होणार; पण हारही हसत स्वीकारता आली पाहिजे. हरणारा खेळाडू जिंकलेल्या खेळाडूचे प्रथम अभिनंदन करतो. खेळातून येणारी ही खिलाडूवृत्ती जीवनात फार उपयोगी पडते.

प्रत्येकाला आपल्या जीवनात केव्हा ना केव्हा संकटाला तोंड द्यावे लागते. कधी हार पत्करावी लागते. अशा वेळी खिलाडूवृत्ती असेल तरच आपण पुढे जातो. अपयशाने खचून जाणाऱ्याच्या हातून काहीचं घडत नाही. जशी हार, तशीच जीत ! हार झाल्याने खचून जाऊ नका. तसेच, जीत झाल्याने फुगून जाऊ नका, असे सच्चा खेळाडू सांगतो. खेळातील जय ज्याप्रमाणे संयमाने स्वीकारावा, तसाच जीवनातील विजयही विनगम्रतेने स्वीकारावा.

खेळात हार-जीत असली तरी खेळ खेळले जातात ते मैत्रीसाठी ! ऑलिम्पिक, विम्बल्डन, एशियाड आदी विविध खेळांच्या जागतिक स्पर्धा वर्षभर खेळल्या जातात, ते एकमेकांचे कौतुक करण्यासाठी, स्नेहाचा हात पुढे करण्यासाठी ! खेळांमुळेच आपली उत्साही वृत्ती टिकून राहते. 


Read

माझे बालपण निबंध मराठी

वाचाल तर वाचाल निबंध मराठी

माझी आई निबंध मराठी मधे

माझे आवडते शिक्षक निबंध

अंधश्रद्धा मराठी निबंध

2 Comments

  1. IT'S VERY VERY MUCH HELPFUL TO ALL OF THE STUDENTS 👍👍🙂

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post