विज्ञान शाप कि वरदान मराठी निबंध | Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh

आजच्या आधुनिक युगात विज्ञान ने खूप तरक्की केली आहे. विज्ञान हे आज अति आवश्यक आहे. पण हे विज्ञान आजच्या युग साठी श्राप आहे कि वरदान? किंवा विज्ञान मुडे मानव सुखी झाला का? या साठी हा विज्ञान शाप कि वरदान मराठी निबंध (vidnyan shap ki vardan marathi nibandh) लिहला आहे.

Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh

आशा करतो तुम्हाला हा निबंध नक्की आवडेल.

विज्ञान शाप कि वरदान मराठी निबंध

'विज्ञान शाप की वरदान?' हा माणसाला पावलोपावली पडणारा प्रश्‍न आहे. विज्ञानाने प्राप्त करून दिलेल्या शेकडा सोयी-सुविधा तो उपभोगत असतो आणि त्याच वेळी वैज्ञानिक शोधांतून ओढवणारे जीवघेणे अपघातही तो अनुभवत असतो. मग त्याला पुनःपुन्हा प्रश्‍न पडतो कौ, विज्ञान हा माणसाला मिळालेला शाप आहे की वरदान? 

'विज्ञान'रूपी ही कामधेनू माणसावर प्रसन्न झाली आणि जीवनात आमूलाग्र बदल झाला. चाकाचा शोध लागल्यामुळे माणसाच्या जीवनाला गती आली. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने आपल्या सर्व इंद्रियांचे सामर्थ्य वाढवले. सात महासागरांपल्याड पसरलेले जग जवळ आले. इतकेच नाही, तर माणसाने अंतराळात झेप घेतली, समुद्राचा थांग लावला. संगणकाच्या साहाय्याने तर माणसाने आजपर्यंत अप्राप्य असणाऱ्या गोष्टी प्राप्त केल्या. इंटरनेटच्या साहाय्याने दूरदूरच्या खंडांत असलेली माणसे एकमेकांना रोज भेटू लागली.

विज्ञानाची ही किमया श्रीमंतांपासून अगदी गरिबांपर्यंत पोहोचली आहे. अगदी खेड्यातही भाकरीच्या पिठासाठी कुणा अन्नपूर्णेला जाते फिरवावे लागत नाही. विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने स्वतःचे कष्ट खूप कमी केले आहेत; तसेच वैद्यकीय क्षेत्राहही अनेक शोध लावून अनेक असाध्य आजारांवर मात केली आहे. हवामानाची व नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना देता येऊ लागली आहे. मोबाईलमुळे तर सगळे जगच आपल्या मुठीत आले आहे. वैज्ञानिक शोधांमुळे अंधश्रद्धांवर मात करता येते. हे सारे पाहिले कौ मन ग्वाही देते, विज्ञान हे मानवाला लाभलेले श्रेष्ठ वरदान आहे. अणुशक्ती ही मानवाला लाभलेली परमशक्‍्ती आहे; पण-

त्याच क्षणी या विसाव्या शतकात झालेल्या दोन विध्वंसक महायुद्धांची आठवण येते. तसेच, ११ सप्टेंबर २००१ रोजी अतिरेक्यांनी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन टॉवर उद्‌ध्वस्त केले. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. अशा भयंकर प्रसंगांतील मानवसंहार पाहिला की विज्ञानाच्या शक्‍तीचाच दुरुपयोग कसा केला जातो, हे प्रकर्षाने जाणवते. गेली पन्नास वर्षे साऱ्या विश्वाला तिसऱ्या महायुद्धाची छाया सतत झाकोळून टाकत आहे. 'तिसरे महायुद्ध' झाले तर

सारे विश्व नष्ट होण्याची भीती आहे. माणसाने आपल्या विज्ञाननिष्ठेने जे काही मिळवले त्यांतूनच माणसाने आपला विनाश ओढवून घेतला आहे, असे म्हणावे लागते.

विज्ञानाच्या साहाय्याने माणसाने भयंकर शस्त्रास्त्रे निर्माण केली, त्यांतेन आज दहशतवाद फोफावला आहे. माणसातला माणूस हरवला आहे आणि तो जास्तीत जास्त स्वार्थी बनत चालला आहे. माणूस निसर्गापासून दूर गेला आहे. त्यामुळे तो सुखी झाला आहे का, याबाबत संशयच आहे. हे पाहिले को प्रश्‍न पडतो, खरोखरच विज्ञान शाप आहे की वरदान?'

तुम्हाला विज्ञान शाप कि वरदान मराठी निबंध (vidnyan shap ki vardan marathi nibandh) हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रां सोबत हा आर्टिकल share करा धन्यवाद.

Read 

आजचा विद्यार्थी ज्ञानार्थी कि परीक्षार्थी मराठी निबंध

आजचा आदर्श विद्यार्थी मराठी निबंध

झाडाची आत्मकथा निबंध मराठी

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post