पृथ्वी चे मनोगत मराठी निबंध | Autobiography of Earth in Marathi Essay | मी पृथ्वी बोलते

तुम्हा सर्वान साठी पृथ्वी चे मनोगत मराठी निबंध (Autobiography of Earth in Marathi Essay) लिहिला आहे. या निबंध मध्ये पृथ्वी ने आपलं आत्मकथन (pruthviche manogat nibandh) व्यक्त केला आहे.

autobiography of earth in marathi essay

या निबंध चे शीर्षक "पृथ्वी ची आत्मकथा" किंवा "मी पृथ्वी बोलते" पण असू शकते हा निबंध तुम्हाला नक्की आवडेल. 

 पृथ्वी चे मनोगत मराठी निबंध

मामाच्या गावी गेलो की, डोंगरावर भटकायला मला खूप आवडते. एकदा असाच भटकत माझ्या नेहमीच्या आवडत्या जागी गेलो. बडाचे झाड... विस्तृत पसरलेले... चहुबाजूंना पारंब्या... थंडगार सावली ! मी जमिनीवर झोकून दिले. कितीतरी वेळ मी उताणा पहुडलो होतो. वर अफाट आभाळ पसरले होते. मनात येऊ लागले... काय असेल हे आभाळ म्हणजे ? कसे असेल ते ? हे झाड, ही माती, हे लहानमोठे दगड, हा डोंगर... कोठून आले हे सगळे ? ही आपली पृथ्वी कशी निर्माण झाली असेल ? ही आपली पृथ्वी व तिच्यासारखे काही ग्रह सूर्याभोवती फिरतात. असे अब्जावधी सूर्य मिळून एक आकाशगंगा बनते ! अशा अब्जावधी आकाशगंगा मिळून एक महाआकाशगंगा बनते ! अशा अब्जावधी महाआकाशगंगा मिळून... बापंरे ! या संपूर्ण विचारचक्राने डोळ्यावर झापडच येऊ लागली.

इतक्यात जमिनीतून आवाज येऊ लागला... '' अरे बाळा, मी पृथ्वी बोलत आहे ! मी पृथ्वी. तुमची धरित्री, धरणी, अवनी, वसुधा, वसुंधरा... ! किती नावे दिली आहेत तुम्ही मला ! आता तू विचार करीत होतास ना, तो मला कळला ! म्हटले, तुला थोडी माहिती द्यावी; तुझ्या ज्ञानात थोडी भर घालावी; म्हणून तुझ्याशी बोलायला मी आले आहे.

“ तुला मी माझी संपूर्ण जीवनकहाणी सांगून कंटाळा आणणार नाही, बरं, का ! तरीपण... तुला ठाऊक आहे का माझे वय  काय?... नाही ना? मग ऐक तर. थोडी थोडकी नव्हेत, तब्बल ५०० कोटी वर्षांपूवी माझा जन्म झाला. सुरुवातीला मी तप्त वायूंचा एक गोळा होते. हळूहळू वायू थंड होत गेले आणि मला भरीव आकार येत गेला. कालांतराने येथे पाणी निर्माण झाले. पाण्यामुळे हळूहळू सजीवांची निर्मिती झाली. 

एकामागून दुसरा, दुसर्‍्यामागून तिसरा... असं होता होता सर्वांचं जीवन एकमेकांशी घट्टपणे बांधल गेलं. सर्व सजीवांच्या जीवन जाळ्याला निर्जीव वस्तूही जोडल्या गेल्या. हे सर्व इतकं एकरूप झालं आहे को, या सृष्टीतला एक घटक जरी नष्ट झाला, तर दुसऱ्याच्या जगण्यावर परिणाम होणार ! नुसती कल्पना करून बघ बघू. सगळी

वनस्पतिसुष्टी एकाएकी अदृश्य झाली, तर काय होईल ? तर... तर... शाकाहारी प्राणी भुकेने तडफडून मरून जातील. बरोबर? . मग मांसाहारी प्राण्यांचे काय ? जे माणसाप्रमाणे मांसाहार ब शाकाहार दोन्ही करतात, त्यांचे काय ? सर्व प्राणी एकमेकांना खाऊन संपवून टाकतील, नाही का? असं घडलं तर संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट होईल !

“ हे तुला मी का सांगत आहे, माहीत आहे ? माणसानेच आज ही सर्वनाशाची पाळी आणली आहे. बुद्धीच्या जोरावर रोगराईवर मात करून माणसाने आपलं आयुष्य वाढवलं. मृत्यूचं प्रमाण कमी केलं. साहजिकच लोकसंख्या वाढली. वाढत्या लोकसंख्येची सोय करण्यासाठी बेसुमार जंगलतोड सुरू झाली.  नस्पती नष्ट होण्यामुळे तिच्यावर अवलंबून असणारे प्राणीही नष्ट होऊ लागले आहेत. सजीवांच्या साखळीतील एकेक प्राणी नष्ट होत आहे. 

त्याचे गंभीर परिणाम सर्व सजीवांना भोगावे लागत आहेत. आधुनिक जीवनशैली निर्माण करण्याच्या नादात माणूस निसर्गापासून दूर गेला. जलप्रदूषण , वायुप्रदूषण, भूप्रदूषण अशा प्रदूषणांमुळे माणसाने निसर्गावर अनन्वित अत्याचार सुरू केले आहेत. मी हे सारे हतबल होऊन पाहत बसले आहे. सुमारे दोनशे लाख वर्षांपूर्वी माणसाची उत्पत्ती झाली. तो माणूस स्वतःच हळूहळू स्वत:च्याच नाशाच्या दिशेने चालला आहे. माणसाला वाचवायचे असेल, तर त्याने पृथ्वीवर, म्हणजेच माझ्यावर जे अत्याचार चालवले आहेत, ते ताबडतोब थांबवले पाहिजेत.

“ तू पोहोचबशील माझा हा संदेश सर्व माणसांपर्यंत ?'' जमीन किंचितशी थरथरली आणि मला जाग आली. त्या. स्वप्नातील प्रसंगाने अजूनही मी अस्वस्थ झालेलो आहे


तर हा होता पृथ्वी चे मनोगत मराठी निबंध (pruthviche manogat nibandh) तुम्हाला हा निबंध कसा वाटलं आम्हाला कंमेंट करून कडवा आणि आपल्या मित्रां सोबत share करा.

Read

मी मुलगी बोलतेय मराठी निबंध

झाडाचे महत्त्व मराठी निबंध

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध

पावसाळा मराठी निबंध

Post a Comment

Previous Post Next Post